शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१०

एक प्रयत्न

बघुया जमतेय का

तुषार

REGISTER

REGISTER

with regards
Tushar

==============================================
Tushar Joshi, Nagpur
MCSD_NET C#, SCJP, RHCE, ZCE, PMP
Software Architect @ Infospectrum India Private Limited, JUGNagpur Leader
http://www.info-spectrum.com
http://www.tusharvjoshi.com
http://www.jugnagpur.com

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१०

आधी लिहायचो...

१९९० पर्यंत लिहायचो.  तेव्हा डायरीत लिहायचो.  मधली २० वर्षे काहीच लिहिले नाही.  डायरी सुटली लॅपटॉप आला.  कविता पण वहीपेक्षा लॅपटॉप वरच लिहायला लागलो.  आता हातात पेन घेउन लिहायला घेतले तर तिसऱ्या मिनिटाला बोटे दुखायला लागतात.  पण कुठेतरी ही शांतता मिटायला हवी, आणि आज ठरवले की थेट या ब्लाग वरच लिहायचे.  मनात येईल ते न ठरवता लिहायचे.

एका प्रेयसीचा ब्लाग सापडला, तिचे हृदय ती लिहितेय कवितांमध्ये, लेखांमध्ये अगदी आपणच प्रेमात पडलोय असे वाटायला लागते.  लगेच विएना मधे तिच्या ब्लाग चा दुवा जोडला आणि आज प्रियकराचा ब्लाग सापडला, आता तर एक एक पोस्ट तिची आणि मग त्याची वाचायला गम्मत वाटतेय.  थोडीबहुत दोघांचीही ओळख असल्याने मला चटकन कळले की या दोघांचे धागे जुळलेले आहेत.  असे काही सापडले की आपण पुन्हा प्रेमात पडलोय असे वाटायला लागते.  हृदयाची गती वाढते. 

कवितांची मिमिक्री करण्याची आयडिया रविवारच्या रेल्वे प्रवासात आली आणि मराठी कविता समूहाच्या विविध कविंच्या शैलीमध्ये काही कविता लिहिल्या तो धागा अनपेक्षितपणे सुपर हिट झाला, खुप मजा आली.

~ तुषार

शनिवार, २० सप्टेंबर, २००८

कवितांचा गाव आणि शीर्षक गीत

एक कवितांचे गाव आहे.  त्या गावात सगळे कवितांवर प्रेम करतात.  कविता करतात.  कविता वाचतात.  जगभर वेगवेगळ्या ठिकाणी राहतात.  मी बोलतोय एका ऑरकूट कम्यूनिटी बद्दल.  हो त्या कम्यूनिटी चे नाव आहे कवितांचा गाव.

या कवितांच्या गावाची खासियत म्हणजे इथले रहिवासी फारच सर्जनशील आहेत.  प्रत्येक वेळी नव नवी अफलातून युक्ती काढून कवितांच्या दुनियेत प्रयोग करत असतात. हो तर या गावक-यांचा नवा प्रयोग आहे गावाचे शीर्षक गीत.

हे छायाचित्र आहे शीर्षक गीत प्रकल्पात सहभागी आणि हजर असलेल्या कलाकारांचे.  


झरे काका काय झकास पोज़ देताहेत आणि मंडळी या गीतात झरे काकांचे फक्त शब्द आहेत बरं आवाज नव्हे.  कदाचित त्यांनी मनात गाणे म्हटले असावे.

या दोन आवाजात शीर्षक गीत ऐकायला हवे असेल तर कवितांच्या गावाच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष यावे लागेल हो. 

हे गीत लिहिणारे कवी खालीलप्रमाणे,

१. स्वामीजी
२. डॉ. राहूल देशपांडे
३. प्राजक्ता खाडिलकर
४. सौ. अनुराधा म्हापणकर
५. चैताली आहेर
६. अनिल 

इतक्या कवींनी मिळून लिहिलेले हे बहुधा पहिलेच गीत असावे.  डॉ. राहूल यांचे परममित्र आणि टिंग्या सिनेमामुळे प्रसिद्धीस आलेले तरूण प्रतिभावान संगीतकार रोहित नागभिडे यांनी मैत्रीखातर या गीताला चालबद्ध केले आहे.

टिंग्या या सिनेमामुळेच माहित झालेले लोकगीताचे गायक बाळू शिंदे यांचा आवाज या गीताला लाभला आहे. 
रोहितने चाल अफलातून लावली आहे, एक गावच डोळ्यासमोर उभा राहतो.  

या माहितीसकट अनुभव तुषार ब्लाग वर माझा हा पहिला सलाम.

तुषार जोशी, नागपुर

बुधवार, १६ ऑगस्ट, २००६

My First Mobile Blog

This is text I am sending through my mail account. This will be easier
as I can send the text from my mobile device mow to blog.

Tushar Joshi, Nagpur